शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘बोल’ जयंत पाटील यांचे, ‘हल्ला’ सदाभाऊंवर,इस्लामपुरात आज राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:53 IST

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले

ठळक मुद्दे हल्लाबोल यात्रा : , नेत्यांच्या भाषणांकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

अशोक पाटील ।इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले नाहीत. अगदी मोदी लटेतही ते तरले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून सोडलेले सदाभाऊ अस्त्र राष्ट्रवादीला धक्के देऊ लागले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत हेच ‘टार्गेट’ राहणार आहेत.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव होते. इस्लामपूर मतदारसंघात वसंतदादा घराण्यातील नेते आणि पतंगराव कदम यांनी जयंतविरोधी नेतृत्वाला खतपाणी घातले; परंतु ते वाया गेले.

गत लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांनी महाआघाडीत सामील होऊन जयंत पाटील यांना अडचणीत आणले होते. मोदी लाटेचा फायदा शेट्टी यांना झाला. विधानसभेला मात्र जयंतविरोधी नेत्यांमध्ये बिघाडी झाली. कॉँग्रेस, शिवसेनेचा सवतासुभा, बळीराजाचे बी. जी. पाटील यांची वेगळी भूमिका पाटील यांच्या पथ्यावर पडली. राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बरांना धक्के बसले. शिराळ्यात राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला. पाटील यांना विधानसभेत विरोधी गटनेते पदावर समाधान मानावे लागले.

सदाभाऊंना मंत्रीपद मिळाल्यापासून त्यांनी राष्ट्रवादीला धक्कातंत्र देण्यास सुरुवात केली आहेत. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी पहिला धक्का दिला. शिवाय ३१ वर्षांची सत्ता उलथवण्याची कामगिरीही पार पाडली. त्यावेळी केवळ जयंत पाटील यांनाच टार्गेट केले गेले. याचा वचपा काढण्यासाठी जयंत पाटीलही सरसावले आहेत. गुरुवारी इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपबरोबरच सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले जाणार आहे.कोणाचाच असर नाही!वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे कधीही सख्य जमले नाही. युती सरकारच्या काळात अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक मंत्री होते. मात्र त्यांचीही मात्रा जयंत पाटील यांच्यावर लागू झाली नाही. उलट नंतर डांगे यांनी पाटील यांच्यासोबत येऊन राष्ट्रवादीला बळ दिले.